अंतरवली सराटी येथे मराठा समाजाच्या पुढील नियोजन संदर्भात बोलावलेल्या बैठकीला फार मोठ्या प्रमाणात मराठा बांधव एकत्र आले होते यावरूनच हि सभा किती मोठी हे दिसून येत आहे, नियोजन बैठकीला आज लाखो मराठा एकत्र आलेले आहेत तर या पुढील होणाऱ्या सभेला पाच कोटी मराठा एकत्र येतील असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. सरकारला कोंडीत पकडण्यासाठी सर्व प्रयत्न आम्ही करू कारण या सरकारने आमचे फसवणूक केलेली आहे ही फसवणूक सरकारला जड जाणार हे नक्की. मनोज जरांगे पाटील यांच्या पुढील सभेची सर्व तयारी पूर्ण झाली असून 900 एकर मधील शेत जमीन चे सपाटीकरण करून हि सभा विराट करण्याची तयारी सुरु आहे.