कराड दक्षिण मधील दक्षिण मांड नदीपात्रातील सर्वच गवे हि पिण्याच्या तसेच शेतीकरिता दक्षिण मांड नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. या वर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झालेमुळे या परिसरांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती आणि याची माहिती व निवेदन हे या सर्व गावातील सरपंच यांच्यातर्फे डॉ. अतुल भोसले यांना देण्यात आले होते व त्यासंदर्भात त्यांनी योग्य ती पाऊले उचलून हे बाब सदर खात्याकडे सोपवून त्यावर योग्य ती मदत करण्याचा अर्ज हा पाटबंधारे विभागाला देण्यात आला. या सर्व बाबी लक्षात घेऊन सदर खात्याने या अर्जाची योग्य ती दाखल घेऊन आज रोजी वारणा प्रकल्पातून वाकुर्डे या उपसा सिंचन योजनेद्वारे दक्षिण मांड नदी पात्रात पाणी सोडण्यात आले.
आज रोजी दि. २६ मार्च २०२४ ला या पाण्याचे पूजन येथील ग्रामस्थ तसेच शेतकऱयांचे हस्ते करण्यात आले, यावेळी डॉ. सुरेश सुकरे, टाळगाव गावचे माजी. सरपंच अण्णासाहेब जाधव, साळशिरंबे गावचे माजी उपसरपंच पै. जयवंत यादव, जिंती गावचे उपसरपंच जयवंतराव शेवाळे, साळशिरंबे गावचे पंकज पाटील, मनव गावचे उपसरपंच दादासो शेवाळे, नांदगाव गावचे सरपंच हंबीरराव पाटील, घोगाव गावचे उपसरपंच निवास शेवाळे, मनव गावचे वि. सेवा सोसायटीचे चेअरमन संताजी शेवाळे, दिनकर पाटील, पोपट साळुंखे, प्रवीण साळुंखे, योगेश पाटील, संतोष पाटील, अशोक पाटील, काशिनाथ पाटील, वैभव पाटील, मयूर जाधव, सागर जाधव तसेस या विभागातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
ऐन दुष्काळात वाकुर्डे योजनेचे पाणी हे कराड दक्षिण च्या नदी पात्रांमध्ये आल्यामुळे या विभागातील पिण्याच्या तसेच शेतीचं पाण्याची गरज पूर्ण झाली आणि त्यामुळे सर्वच ग्रामस्थांकडून डॉ. अतुल भोसले यांचे आभार मानले जात आहेत.